Big News for Ration Card Holder: तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी रेशन कार्डवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत (NFSA) सरकारी धान्याचा लाभ घेत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. खऱ्या आणि गरजू लोकांनाच या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डच्या नियमांत मोठे बदल केले जाणार आहेत.
अनेक लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही आपली खरी माहिती लपवून मोफत किंवा स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. अशा बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांना आता या योजनेतून कायमचे वगळले जाणार आहे.
ई-केवायसी आणि आधार लिंक नसणाऱ्यांना पहिला झटका
सध्या ई-पॉस (e-PoS) मशीनवर लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करूनच धान्य दिले जाते. मात्र, कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीचे नाही, तर रेशन कार्डवरील सर्व सदस्यांचे ‘आधार सीडींग’ (Aadhaar Seeding) पूर्ण असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप कुटुंबातील सदस्यांचे आधार लिंक केलेले नाही, अशा सदस्यांची नावे थेट ऑनलाईन आरसीएमएस (RCMS) प्रणालीतून वगळली जाणार आहेत. तसेच, ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यांचे रेशन वाटप शासनाकडून तात्पुरते बंद करण्यात येत आहे.
रेशन योजनेसाठी कोण ठरणार अपात्र? (नवीन निकष)
शासनाच्या नवीन नियमावलीनुसार, खालीलपैकी कोणतीही एक अट लागू होत असल्यास संबंधित लाभार्थी रेशन मिळवण्यासाठी अपात्र ठरेल:
- उत्पन्नाची अट: शहरी भागात वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि ग्रामीण भागात २ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास.
- वाहने व मालमत्ता: ज्यांच्याकडे स्वतःचे चारचाकी वाहन आहे.
- जागा व घर: १०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःचे पक्के घर असणारे नागरिक.
- व्यावसायिक व इतर निकष: आयकर (Income Tax) भरणारे नागरिक.
- शहरात ८० चौरस मीटरपेक्षा जास्त आकाराचे दुकान/गाळा असलेले लोक.
- ज्यांच्या घरात एसी (वातानुकूलित यंत्र) आहे किंवा ५ KW क्षमतेचे जनरेटर (DG) आहे.
अपात्र लाभार्थ्यांवर होणार मोठी कारवाई, बाजारभावाने होणार वसुली
शासनाने अशा लोकांसाठी कडक इशारा दिला आहे की, जर तुम्ही वरील निकषांमध्ये बसत असाल आणि तरीही खोटी माहिती देऊन रेशन घेत असाल, तर तुमचे रेशन कार्ड स्वतःहून सरेंडर करा (जमा करा). जर तपासणीत कोणी दोषी आढळले, तर केवळ त्यांचे रेशन कार्डच रद्द होणार नाही, तर त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या संपूर्ण धान्याची ‘बाजारभावाने वसुली’ केली जाणार आहे. एवढेच नाही, तर अशा बोगस लाभार्थ्यांवर कायदेशीर गुन्हा (FIR) देखील दाखल केला जाऊ शकतो.
६ महिने धान्य न घेतल्यासही कारवाई
अनेक नागरिक रेशन कार्ड काढतात पण अनेक वर्षे किंवा महिने धान्य उचलत नाहीत. जर एखाद्या शिधापत्रिकाधारकाने सलग सहा महिन्यांपर्यंत रेशन दुकानातून धान्य घेतले नाही, तर त्यांना धान्याची गरज नाही असे समजून त्यांची नावे देखील यादीतून वगळण्यात येणार आहेत.
काय करावे?
तुमचे रेशन चालू राहावे असे वाटत असेल, तर लवकरात लवकर जवळच्या रेशन दुकानात जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी (e-KYC) आणि आधार सीडींग पूर्ण करून घ्या. तसेच, दरमहा अनुज्ञेय असलेले धान्य नियमितपणे उचलत राहा.