नमस्कार शेतकरी मित्रांनो! सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) सुरू आहे. ६ मार्च २०२६ रोजी राज्याचा मुख्य अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण त्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे – यंदाच्या Maharashtra Budget 2026 मध्ये सरसकट कर्जमाफी मिळणार का? मोफत वीज आणि नमो शेतकरी योजनेचे काय होणार?
चला तर मग, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार बजेटमधील शेतीशी संबंधित ठळक मुद्दे सोप्या भाषेत समजून घेऊया.
१. शेतकरी कर्जमाफी (Farmer Loan Waiver Status)
शेतकरी ज्याची सर्वात आतुरतेने वाट पाहत आहेत ती म्हणजे कर्जमाफी. सध्या मिळालेल्या Agriculture News नुसार, बँकांकडून थकीत कर्जदारांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. यासाठी नेमलेल्या परदेशी समितीचा अहवाल एप्रिल महिन्यात येईल. त्यामुळे ६ मार्चच्या बजेटमध्ये लगेच कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता कमी आहे. पण पावसाळी अधिवेशनात (जुलै महिन्यात) यावर फायनल निर्णय होऊन थेट निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो.
२. ७.५ HP पर्यंत मोफत वीज (Free Electricity for Farmers)
शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा म्हणजे, ७.५ HP पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याची योजना या बजेटमध्येही Continue राहणार आहे. यासाठी शासनाने मोठी आर्थिक तरतूद केली असून पुढील ५ वर्षे ही योजना चालू राहील.
३. नमो शेतकरी सन्मान योजना (Namo Shetkari Yojana Subsidy)
पीएम किसान योजनेसोबतच राज्य सरकारकडून मिळणारे वर्षाचे ६,००० रुपये नियमित चालू राहतील. या योजनेसाठी बजेटमध्ये आधीच निधी राखून ठेवण्यात आला आहे, त्यामुळे पुढील हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर जमा होतील.
४. जलयुक्त शिवार आणि सिंचन (Irrigation Projects)
पाण्याची टंचाई कायमची दूर करण्यासाठी ‘जलयुक्त शिवार’ योजना आणि नवीन सोलर पंप (Solar Pump Scheme) वाटपासाठी बजेटमध्ये विशेष तरतूद केली जात आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाचा फायदा मिळेल.
५. कांदा आणि हमीभाव (MSP Updates)
सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. अधिवेशनात यावर जोरदार चर्चा सुरू असून, कांद्याला अनुदान किंवा योग्य हमीभाव (MSP) मिळवून देण्याबाबत लवकरच काही सकारात्मक घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.